स्वर्गीय डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञानासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजावीत या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. साठ वर्षांपूर्वी त्यांनी जे सांगितले ते काळाची गरज आहे. देशाच्या विकासाचा खरा निकष देशात बांधण्यात आलेले कारखाने, धरणे, रस्ते आणि पॉवर हाऊसची संख्या नसून लोक, त्यांची मूल्ये आणि राष्ट्रीय, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाप्रती असलेली निष्ठा हा आहे. शिक्षण संस्थेने मातृभूमीवरील प्रेम, कर्तव्यकर्ता, करुणा, सहिष्णुता, स्त्रियांचा आदर, प्रामाणिकपणा, स्वावलंबन, कृतीतील जबाबदारी आणि शिस्त व त्याग ही मूलभूत मूल्ये रुजविली पाहिजेत. डॉ. बापूजी साळुंखे हे थोर द्रष्टे होते. भविष्यातील समाजातील आव्हानांचा त्यांनी अंदाज घेतला आणि त्यानुसार त्यांनी संस्थेची प्रार्थना रचली. डॉ. सतीश स. देसाई,
प्रभारी प्राचार्य